Popular posts from this blog
How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )
राजगड हा किल्ला पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर आहे. गुंजवणी गाव हे पायथ्याच गाव आहे. राजगडला मुरुंबदेवाचा डोंगर असेही म्हणतात. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय महत्वाचा होता कारण ह्या किल्ल्या पर्यंत पोहोचण्यासाठी कोणती ना कोणती नदी पार करूनच पोहोचावे लागत होते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी केली होती. मी बऱ्याच वेळा राजगडावर गेलो होतो. पण आमच्या वाड्या मधले माझे ३ मित्र ह्या किल्ल्यावर कधीच गेले नव्हते. आणि मी असाच एकदा ऑफिस मधून घरी आलो आणि सगळे मित्र कट्यावर बसून चर्चा करत होते तितक्यात मी तिथे पोहचलो, मी त्यांना काही विचारायच्या आधीच त्यांनी मला विचारले अरे राजगडावर जायचय येणार का??? मी पटकन हो म्हंटल त्यांना ते कळलाच नाही. कारण नेहमी मला बाहेर कुठे येणार का म्हणून विचारल तर मी नेहमी त्यांना काहीतरी कारण सांगून नाही म्हणायचो. ते खूप खुश झाले. लगेच म तारीख ठरवून टाकली ४ आणि ५ जुन २०१६. म फुल चर्चा चालू झाली कधी निघायचं त्या दिवशी?? काय काय घ्याव लागेल?? मी पण त्यांना सांगत होतो. ठरल्या प्रमाणे आम...
स्मित हास्य तिचे खुलले
पाहुनी गुलाब पुष्प, स्मित हास्य तिचे खुलले, मृग नक्षत्रातील सरींनी, सह्याद्रीतील डोंगर–दऱ्या, हीरवाई न बहरले. मनमोहक अशा वातावरणात दोघांतील प्रेम देखील बहरले, त्या दोघांचे प्रेम पाहून, गुलाब पुष्प देखील लाजले. खळखळणारे झरे देखील जागीच थबकले, मदनाच्या वाऱ्याने ढग सुद्धा सरले. जिथे फुलांचे गंधही तिच्यासाठी थांबून राहिले, तिच्या प्रत्येक नजरेत एक अव्यक्त गूज होते दडले. ओलसर मातीच्या दरवळात तिच्या आठवणी रुजल्या, पावसाच्या सरींमध्ये शब्दही नकळत भिजून गेले. त्या धुके छादीत डोंगरावर आम्ही आपली स्वप्ने रेखाटली, एकमेकांच्या नजरेतच आमची सगळी दुनिया सामावली.
How to Reach Rajmachi Fort From Pune (कसे जाल राजमाची किल्ल्यावर)
राजमाची हा किल्ला लोणावळ्या जवळच आहे. उधेवाडी हे पायथ्याच गाव आहे. तुंगार्ली मार्गे आपल्याला राजमाची ला जाता येत. पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्ली ला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात. अथवा आपण तिथून मेन रोड पर्यंत जाव आणि तिथेच एक भारत पेट्रोलियम चा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजरून्च हि वाट जाते. ही वाट थेट राजमाची च्या पायथ्या पर्यंत जाते. किमान ३ ते ४ तास सलग आपल्याला चालावे लागते कारण लोणावळा ते उधेवाडी हे अन्तर किमान १६ किलोमीटर अंतर आहे. उधेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त २०-२२ घर असतील. गावात खायची व राहायची उत्तम सोय होते. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. तसा मी राजमाची ला ३...

मस्त शिक्षक... छान
ReplyDelete