Posts

Showing posts with the label Sahyadri

वजीर सुळका एक चित्तथरारक अनुभव

Image
आधीच्या माझ्या पोस्ट मध्ये वजीर सुळक्याचे वर्णन आहेचे. पण महाराष्ट्रातील सहयाद्री च्या दऱ्या खोऱ्यात आपण हिंडू फिरू लागलो कि आपल्याला हे अनेक वेगवेगळे डोंगर, दऱ्या, घाटवाटा, वेगवेगळ्या नाळी, किल्ले आणि अर्थातच सुळके हे आपल्याला साद घालू लागतात आणि आपली पाऊले अपोआपच तिकडे वळतात. माझे आज पर्यंत साधारण ५३ किल्ले पाहून झाले होते पण त्यात सुळक्याचा सहभाग/अनुभव नव्हता. पण त्याला साजेसे ट्रेक मात्र माझे झाले होते उदा:- ढाक चा बहीरी, अलंग-मदन-कुलंग, लिंगाणा, तैल-बैला इ. पण सुळक्याचा अनुभव नव्हता. बरेच जण बोली भाषेत म्हणतात सुरवात नेहमी लहान गोष्टीनी करावी म्हणजे जड गोष्टी पेलायची सवय लागते. पण माझे मत जरा वेगळेच आहे सुरवातच अवघड गोष्टींपासून करा म्हणजे सोप्पी गोष्ट अजून सोप्पी होते. मला माहिती असलेल्या सह्याद्री मधील काही सुळक्याची नावे खालील प्रमाणे १) कळकराई सुळका २) वानरलिंगी सुळका ३) वजीर सुळका ४) बाण सुळका ५) नवरा- नवरी सुळका साधारण ३ वर्षांपूर्वी मी अशीच सह्य भटकंती करत असताना माझ्या कानी हे नाव प्रथम पडले आणि माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणजे वजीर सुळका सर करा...

खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही

Image
खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही । धन, धान्य, पशु, पक्षी, सर्वच प्राणी मात्रांची चांगलीच होती नांदी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अनेक आक्रमण पाहिले आम्ही । अनेक लढाया आणि महा पराक्रमी सुद्धा पाहिले आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अचानकच मोठी टोळी आली गोरी । उध्वस्त केले सारे काही । मग काही काळ निपचित पडलो आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। पुन्हा काही रांगड्या सवंगड्यांची आली टोळी । पुन्हा नव्याने समृद्ध होण्याची दिली संधी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। परत पूर्वीच्या समृद्धी ची आठवण हळू हळू होत होती । ह्यातच आली मोठी महामारी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। महामारी मुळे पुन्हा उध्वस्त होऊ का आम्ही?? तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।।

How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )

Image
भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर ह्या मार्गाने जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती. भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते. राजगुरुनगर-भोरगिरी रस्त्यावर असलेल्या चास गावातील गढी आणि दिपमाळ, भोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला आणि भोरगिरी - भिमाशंकर हा ट्रेक अशी सर्व ठिकाण भोरगिरी किल्ल्या बरोबर पाहाता (करता) येतात. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. शेजारच्या वाड्यातला रुषिकेश खूप दिवस झाले माझ्या मागे लागला होता सौऱ्या किल्यावर जायचं आणि तुझ्याच बरोबर. आणि त्याच काळात आमच्या वाड्यातला तेजस भाऊ दुबई वरून परत आले हो...

How to Reach Ghangad Fort from Pune ( कासे जाल घनगडावर )

Image
घनगड हा किल्ला महाराष्ट्राच्या लोणावळ्या पासुन साधारण ३० किलोमीटर असलेल्या एकोले या गावाजवळ आहे, हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. हा किल्ला अंदाजे ३००० फूट उंच असून फारसा अवघड नाही. ह्या किल्ल्याची फार अशी माहिती उपलब्ध नसल्याने इतिहासा बद्दल मला तरी माहिती नाही. पण ह्या किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केली होती. नंतर पुरंदरच्या तहामध्ये हा महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. त्या नंतर महाराजांनी परत तो घेतला त्या नंतर तो राजाराम महाराजांपर्यंत मराठ्यांकडे होता. त्यांच्या मृत्यु नंतर तो परत मोघालांकडे गेला. त्या नंतर परत तो महाराणी ताराबाई यांनी घेतला. या नंतर हाच किल्ला कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांकडे दिला त्यानंतर त्यांनी बालाजी विश्वनाथ पेशवे यांना दिला त्यानंतर त्या दरम्यान मराठ्यांनी कोकणातल्या वाईट लोकांवर आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. तेव्हा ह्या किल्ल्यावर २५ सैनिक होते त्यांनी पण ह्यात सहभाग घेतला होता. नंतर ह्या किल्ल्याचा वापार पेशव्यांनी कैदी ठेवण्यासाठी केला. आणि सगळ्यात शेवटी १८१८ साली तो ब्रिटीश्यांच्या कडे गेला. अनेक दिवसांपा...

How to Reach Rajmachi Fort From Pune (कसे जाल राजमाची किल्ल्यावर)

Image
राजमाची हा किल्ला लोणावळ्या जवळच आहे. उधेवाडी हे पायथ्याच गाव आहे. तुंगार्ली मार्गे आपल्याला राजमाची ला जाता येत. पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्ली ला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात. अथवा आपण तिथून मेन रोड पर्यंत जाव आणि तिथेच एक भारत पेट्रोलियम चा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजरून्च हि वाट जाते. ही वाट थेट राजमाची च्या पायथ्या पर्यंत जाते. किमान ३ ते ४ तास सलग आपल्याला चालावे लागते कारण लोणावळा ते उधेवाडी हे अन्तर किमान १६ किलोमीटर अंतर आहे. उधेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त २०-२२ घर असतील. गावात खायची व राहायची उत्तम सोय होते. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. तसा मी राजमाची ला ३...

How to Reach KalavantinDurga Fort or PrabalGad Fort From Pune (कसे जाल कलावंतीण दुर्ग किंवा प्रबळगडावर)

Image
कलावंतीण आणि प्रबळगड हे जोड किल्ले आहेत प्रबळ माची हि ह्या दोन किल्ल्यांना वेग वेगळ करते. कलावंतीण हा एक सुळका आहे आणि अंदाजे महाराजांच्या काळी टेहळणी साठी वापर होत असेल अस वाटत. तर प्रबळगड आकाराने बराच मोठा तसेच उंचीने सुद्धा कलावंतीण पेक्षा उंच आहे. प्रबळगडावर आपल्याला फिरायला देखील बरच आहे मात्र कलावंतीण हा सुळका असल्या मुळे फिरता येत नाही पण बर्याच गिर्यारोहकांचे स्वप्ना असते कि ह्या किल्ल्यावर जावे. प्रबळगडावरून आपल्याला कलावंतीण चे दृश्य अगदी नीट पाहता येते. तसेच कलावंतीण चे खास आकर्षण असणाऱ्या सह्याद्री मधल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील एकदम नीट दिसतात. पावसाळ्या मध्ये कलावंतीण चा सुळका बऱ्याच वेळेला ढगातच असतो आणि बराच भाग ओला असल्यामुळे घसरडा देखील असतो. ठाकूरवाडी हे पायथ्याचे गाव असून पनवेल पासून एस.टी. ने अर्ध्याच तासात पोहोचतो. कलावंतीण दुर्ग ह्या किल्ल्यावर जाण्याची ईच्छा अनेक दिवसांपासून होती पण काही मुहूर्त लागेना आणि एकदा नाही हो करता करता तो दिवस ठरला १२ फेब्रुवारी २०१७. म्हणजे १२ तारखेला काहीही झाल तरीही मी एकटा का होईना जाणारच होतो आणि तशी मनाची तयारी पण केल...