Posts

Showing posts with the label History

How to Reach Rajmachi Fort From Pune (कसे जाल राजमाची किल्ल्यावर)

Image
राजमाची हा किल्ला लोणावळ्या जवळच आहे. उधेवाडी हे पायथ्याच गाव आहे. तुंगार्ली मार्गे आपल्याला राजमाची ला जाता येत. पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्ली ला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात. अथवा आपण तिथून मेन रोड पर्यंत जाव आणि तिथेच एक भारत पेट्रोलियम चा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजरून्च हि वाट जाते. ही वाट थेट राजमाची च्या पायथ्या पर्यंत जाते. किमान ३ ते ४ तास सलग आपल्याला चालावे लागते कारण लोणावळा ते उधेवाडी हे अन्तर किमान १६ किलोमीटर अंतर आहे. उधेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त २०-२२ घर असतील. गावात खायची व राहायची उत्तम सोय होते. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. तसा मी राजमाची ला ३...

How to Reach Tung Fort From Pune (कसे जाल तुंग किल्ल्यावर)

Image
पुणे रेल्वे स्टेशन वरून सकाळी ८.०० वाजता ची पुणे ते लोणावळा लोकल मधून लोणावळ्यात सकाळी ९.४५ वाजता पोहचलो. तिथून शिवाजी उद्यान पर्यंत चालत गेलो. शिवाजी उद्यान च्या समोर बस थांबा आहे. तिथे चौकशी केली तुंग वाडी ला कसं जायचं? तर अशी माहिती मिळाली. १०.०० एक बस काळे-पिसोळी किंवा तुंगी फाट्या पर्यंत जाते. शिवाजी उद्यान पासून संध्याकाळी ४:३० वाजता एकच बस आहे आणि ती तुंग वाडी गावात मुक्कामी असते आणि सकाळी साधारण ७ वाजता परतते. पण आम्ही बस ची वाट न पाहता तिथल्या शेअर गाडी मधून त्या फाट्या पर्यंत पोहचलो. शिवाजी उद्यान ते काळे-पिसोळी फाटा किंवा तुंगी फाटा तिथपर्यंत पोहचायला अंदाजे २० मिनिटे लगतात. तिथून साधारण १ तास चालत गेल कि आपण तुंग किल्ल्या च्या पायथ्या पर्यंत पोहोचतो. आम्ही फाट्या पासून १०:३० वाजता चालायला सुरवात केली. किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही १२:०० वाजता पोहचलो. वाटे मध्ये फार कमी वाहनांची वर्दळ जाणवते. रस्त्या च्या दोन्ही बाजूना मस्त झाडी आहेत. मध्य वाटे वर वान्नारंच वास्त्यव्य आहे. पण आपली चाहूल लागताच ते पळून जातात. किल्ल्याच्या पायथ्याला एक मंदिर आहे. तसेच तिथे गाड्या पैसे देऊन ल...