How to Reach Tung Fort From Pune (कसे जाल तुंग किल्ल्यावर)


पुणे रेल्वे स्टेशन वरून सकाळी ८.०० वाजता ची पुणे ते लोणावळा लोकल मधून लोणावळ्यात सकाळी ९.४५ वाजता पोहचलो. तिथून शिवाजी उद्यान पर्यंत चालत गेलो. शिवाजी उद्यान च्या समोर बस थांबा आहे. तिथे चौकशी केली तुंग वाडी ला कसं जायचं? तर अशी माहिती मिळाली. १०.०० एक बस काळे-पिसोळी किंवा तुंगी फाट्या पर्यंत जाते. शिवाजी उद्यान पासून संध्याकाळी ४:३० वाजता एकच बस आहे आणि ती तुंग वाडी गावात मुक्कामी असते आणि सकाळी साधारण ७ वाजता परतते. पण आम्ही बस ची वाट न पाहता तिथल्या शेअर गाडी मधून त्या फाट्या पर्यंत पोहचलो. शिवाजी उद्यान ते काळे-पिसोळी फाटा किंवा तुंगी फाटा तिथपर्यंत पोहचायला अंदाजे २० मिनिटे लगतात. तिथून साधारण १ तास चालत गेल कि आपण तुंग किल्ल्या च्या पायथ्या पर्यंत पोहोचतो. आम्ही फाट्या पासून १०:३० वाजता चालायला सुरवात केली. किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही १२:०० वाजता पोहचलो. वाटे मध्ये फार कमी वाहनांची वर्दळ जाणवते. रस्त्या च्या दोन्ही बाजूना मस्त झाडी आहेत. मध्य वाटे वर वान्नारंच वास्त्यव्य आहे. पण आपली चाहूल लागताच ते पळून जातात. किल्ल्याच्या पायथ्याला एक मंदिर आहे. तसेच तिथे गाड्या पैसे देऊन लावण्याची सोय देखील आहे. ते सर्व पाहायला गावातले एक काका तिथे असतात. जरका आपल्याला जेवण किंवा भजी हवी असल्यास त्यांना तसे आधी सांगावे लागते. जर तिथे कोणी नसल्यास तिथे बोर्ड वर तेंचा फोन नंबर दिला आहे.

पायथ्या पासून किल्ल्यावर पोहचायला अर्धा पाउण तास लागतो. किल्ला तसा कठीण नाहीये पण काही जागा अश्या आहेत तिथे नवीन चढाई करणारानी काळजी घेणे आवश्यक आहे. किल्ल्याच्या चढाई च्या अंतिम टप्प्यात एक दगडातली मारुतीची व गणपतीची मूर्ती पहावयाला मिळते. किल्ल्यावर पोहचताच आपल्याला किल्याचे प्रवेशद्वार भग्न आवस्थेत पाहवयास मिळते. ते पाहूनच आपल्याला कळते कि किल्ल्यावर किती गोष्टी शाबूत आहेत ते. किल्ल्याची तटबंदी पूर्ण पणे नाहीशी झालेली आहे.

किल्ला पहायचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिला दरवाजा पार करून जाताच लगेच आपल्याला दुसरा दरवाजा लागतो तो गो मुखी असल्याचे आढळून येते. अगदी तोरणा किल्ल्याची आठवण येते. लगेच तिथूनच एक वाट डावी कडे दिंडी कडे जाते. आणि उजवी कडे आपण किल्ल्यावर जातो. (दुसरा टप्पा) वर गेल्यावर परत एक वाट डावी कडे जाते तिथून अगदी शेवटच्या टोकावरून दिंडी चे वरून दृश्य पहावयास मिळते. मागे फिरून आपण पुढे जाताना आधी हनुमानाचे मग तुळजाई मातेचे आणि शेवटी गणपतीचे मंदिर लागते. हि मंदिर अगदी लहान लहान आहेत. गणपती मंदिरा शेजारी एक पाण्याचे टाके आहे. हे पाणी पिण्या योग्य नाही. (तिसरा टप्पा) बालेकिल्ल्यावर जाताना डावी कडे वाट बालेकिल्ल्यावर जाते आणि उजवी कडे जी वाट जाते तिथे एक पाण्याचे टाके आहे.

हे पाणी पिण्या योग्य आहे.बालेकिल्ल्यावर तुंगाई मातेचे मंदिर आहे. बालेकिल्ल्या वरून आपल्याला पावना डयाम चे तीनही बाजूनी पाण्याने वेढलेले विहंगम दृश्य पहव्यास मिळते.


संपुर्ण किल्ला एक तासात पाहून होतो. किल्ल्यावर राहायची सोय नाही.

Comments

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

माहिती होत ती बोलणार नाही काही