How to Reach Kalsubai From Pune ( पुणे ते कळसुबाई कसे जाल )


लहानपणी पासून भूगोलाच्या पुस्तकात किवा मोठ्या लोकांन कडून ऐकत होतो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पण जस महाविद्यालयात जायला लागलो तेव्हा कळाल कि त्या शिखरावर सुद्धा जाता येत. मग तेव्हा पासून इंटरनेट वर कसे जायचे फोटो असे कायम शोधत होतो.

आणि तो दिवस आला मी आणि माझा भाऊ निलेश अस आम्ही जायचं ठरवलं आणि २५/०३/२०१६ ला दुपारी जेवण करून घरून निघालो, शिवाजीनगर बस स्थानकातून संगमनेर ला जाणारी बस पकडली, आणि आमचा प्रवास सुरु झाला. साधारण २:३० -- ३:०० च्या बेतला आमची गाडी सुटली. खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला संगमनेर ला पोहचायला संध्याकाळी ७:०० वाजले. तिथे आम्ही चौकशी केली कि राजूर किवा बारी ला कस जायचं?? तर तिथून अशी माहिती मिळाली राजूर ला राहायची सोय चांगली नाही तर तेच्या अलीकडे अकोले नावच गाव आहे तिथे नीट राहता येईल. म बस ची चौकशी केली तर अकोले ची बस लगेच ८:०० वाजता होती आणि तिथूनच बारी किवा राजूर पर्यंत जाता येईल अस कळाल. म तिथे चहा घेतला आणि अकोले च्या गाडीत बसलो. साधारण रात्री ९:०० च्या बेताला आम्ही अकोले स्थानकात पोहचलो. तिथे उतरल्या उतरल्या चौकशी केली कि राजूर किवा बारी गावात जायला कोणती गाडी आहे का तर अस कळाल रात्री ११:३० ला एक बस राजूर ला जाते, ती नाही आली तर दुसर्या दिवशी सकाळी ५:३० ची गाडी आहे. म आम्ही रात्री चा डबा आणला होता तो तिथे स्थानकात बसून खाल्ला. उन्हाळ्याचे दिवस होते जेवण मस्त झाल होत, समोरच ऊसाच गुह्राळ होत तेच्या कडून मस्त २-२ ग्लास रस घेऊन पिला. आता आम्ही एकदम निवांत झालो होतो. कारण गाडी थेट उद्या सकाळी होती आणि आम्ही तिथे राहण्याची मनाची तयारी केली होती. मग ५ मिंनट बसलो पण काही करमेना. मग म्हंटल पाहूयात गावाकडे जाणाऱ्या कोणत्या गाड्या किवा टेम्पो आहेत का? दोन गाडी वाल्यांना विचारल ते नाहि म्हंटले मग एक ट्रक दिसला त्या काकांना विचारल बारी गावात जाणार का?? ते हो म्हणाले आणि ते एकटेच होते आम्ही आनंदानी ट्रक मध्ये बसलो आमचा हा ट्रक चा पहिलाच अनुभव/प्रवास होता. वाटेत काकांशी मस्त गप्पा तेंचे अनुभव ऐकायला मिळाले. अश्यातच वेळ कसा गेला आणि बारी गावापर्यंत कधी आलो कळलच नाही. काकांनी सांगितल पायथ्याशी एक हनुमानाचे मंदिर आहे तिथे तुम्ही आजची रात्र काढा आणि सकाळी उठून कळसुबाई वर जावा. आता रात्रीचे १२:३० झाले होते गाव झोपलं होत आणि आम्ही गावात शिरलो, आमची चाहूल लागताच गावाच्या सुरवातीच्या पहारेकर्यांनी म्हणजेच कुत्र्यानी तेच्या साथीदारांना कळवलं तसेच आम्ही घाबरलो पण आमच्या सुदैवानी त्यांनी आम्हाला काहीच केल नाही. आणि आम्ही घाबरत घाबरत पुढे गावात जात राहिलो आणि एक ५ मिनटाच मंदिरा पर्यंत पोहचलो. मंदिरात दिवा चालू होता आणि गावातली मंडळी पण होती जरा धीर मिळाला. तेनी आमची चौकशी केली जेवण वगैरे झाल का नाही हे देखील विचारले. खूप छान वाटल. म आम्ही झोपायची तयारी केली अंथरूण, पांघरूण जवळ होत. आणि साधारण १२:४५ ला सकाळी ४:३० चा गजर लाऊन झोपलो. मस्त झोप लागली.

आणि पहाटे गजर झाला तेव्हा जाग आली. म आम्ही अवरल आणि साधारण ४:४५ किवा ५:०० च्या बेतला आम्ही कळसुबाई शिखर सर करायला सुरवात केली. अंधार होता आम्ही विजेरी (battery) जवळ होतीच आणि चंद्र आजून मावळला नव्हता, अशी आमच्या दोघांना त्या दोघांचीच साथ होती. बाकी कोणीच नव्हते. हळू हळू आम्ही मस्त गप्पा मारत चाललो होतो. ह्या आधी आम्ही दोघांनी पण हे ठिकाण पहिले नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप होती, गमतीचा भाग म्हणजे भावाला जास्त ट्रेकिंग चा अनुभव नाही तो माझ्या भरवश्यावर आणि मला अनुभव होता पण ठिकाण नवीन म्हणून मी देवाच्या भरवश्यावर....

हळू हळू थांबत थांबत आम्ही शिखराच्या एका टप्प्या पर्यंत पोहचलो तिथे अस लक्षात आल कि आमच्या आधीच म्हणजे रात्रीच एक group वर तम्बून मध्ये राहिलेला आहे. साधारण १० जण असतील ते. तेंच्या मधले काहीच जण उठले होते. ह्या ठिकाणी एक छोटस पाण्याच टाक आहे आम्ही तिथे न थांबता पुढे थेट शिखरावर निघालो आता मात्र दिवस उजाडायला लागला होता. खूप छान वाटत होत मन एकदम प्रसन्न आणि एक आनंद होता. कि आपण कळसूबाई शिखर सर करणार्यान पैईकी एक होणार अगदी काहीच मिनटात. आणि आम्ही वरती पोहचलो. आणि अगदी आता काहीच वेळात सूर्य उदय होणारच होता अश्या वेळीस आम्ही वरती होतो. खूप म्हणजे खूप वारा जोर जोरानी वाहतच होता आजीबात थांबत नव्हता. आम्ही साधारण २:०० -- २:३० तासात वर देखील पोहचलो. आम्हाला खरच नव्हत वाटत कि आम्ही त्या शिखरावर आलो आहोत. खूप भारी वाटत होत.
पण आम्ही सूर्य उदय पहिला कळसुबाई देवीचे दर्शन घेतले थोडे फोटो काढले आणि लगेच परतीचा प्रवास चालू केला.
साधारण २:०० तासात आम्ही खाली उतरलो. मग खाली पायथ्याला आम्ही चहा आणि थोडा नाश्ता केला आणि गावाचा निरोप घेतला. परतताना आम्ही जीप मधून बारी ते राजूर असा प्रवास केला. राजूर ते अकोले बस ने प्रवास केला आणि ती बस सोडली अकोले पासून परत संगमनेर ची बस केली आणि संगमनेर ला उतरलो तिथे वडापाव अस थोडस खाल्लं. आणि परत संगमनेर ते पुणे असा प्रवास केला आणि घरी साधारण ५:30 पोहचलो...


अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणे ते संगमनेर १५१/-
संगमनेर ते अकोले २५/-
अकोले ते बारी (ट्रक) ५०/-
एकूण खर्च 226/-


परतीचा एकाचा खर्च : बारी ते राजूर(जीप) ३०/-
राजूर ते अकोले २०/-
अकोले ते संगमनेर (बस) 25/-
संगमनेर ते पुणे 151/-
एकूण खर्च 226/-

****काही महत्वाच्या गोष्टी****

    • शिखराच्या पायथ्याच्या गावात मंदिरात राहायची सोय आहे. तिथे साधारण १५ ते २० जण राहू शकतात. गावकरी खूप मदत करतात.
    • जेवणाची सुद्धा सोय गावात होते.
    • वर चढताना किमान २ लिटर पाणी एका जवळ असावे. शिखराच्या एकदम शेवटच्या टप्प्यात पाण्याच टाक आहे. त्यात अतिशय थंड व पिण्यायोग्य पाणी मिळते. बाकी वाटेत कुठेच पाणी नाही.
    • नवीन चढाई करणार्यांनी काही ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या बरोबरच्या प्रमुखाचे ऐकावे.पावसाळ्यात हा परिसर छान दिसतो तेवढाच घसरडा होतो.
  • Comments

    Popular posts from this blog

    How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

    पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

    माहिती होत ती बोलणार नाही काही